Skip to main content

जिवनावश्यक वस्तु दुरूस्ती कायदा - 2020


  

कायदा 3 - जिवनावश्यक  वस्तु दुरूस्ती कायदा 2020,  (Essential Commodity Act 2020)  

पुर्वीचा असणारा 1995 वस्तू विधीनियमात दुरूस्ती करून जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 केंद्र सरकारने  संमत केला आहे. पुर्वीच्या कायद्याने कांदे , बटाटे, गहू, ज्वारी,  बाजरी, डाळी, तेल ,  तेलबिया तृणधान्ये यांचा साठा करता येत नसे.  जिवनात आवश्‍यक असणार्‍यां वस्तु म्हणून या अन्न वस्तु कडे पाहिले जाई . परंतू नव्या कायद्याने वरील वस्तु ह्या जिवनावश्‍यक वस्तु राहत नाहीत.  पुर्वीच्या कायद्याने त्यांचा संग्रह, साठेबाजी करता येत नसे.  यामुळे बाजारात टंचाई झाल्यास शासनाचे प्रतिनीधी अशी साठेबाजी करणारांवर कायदेशीर कार्यवाही करून हा साठा बाहेर काढू शकत होते.  माहागाईवर नियंत्रण मिळवू शकत होते.  परंतू आता मोंदींनी केलेल्या नव्या कायद्याने  जिवनावश्यक  वस्तुंचा साठा करणे कोणत्याही व्यापारी, उद्योगपती, भांडवलदार यांना शक्य आहे.  यामुळे महागाई वाढून पैसेवाला वर्ग अधिक शोषण करून  श्रीमंत होईल. 


जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 या कायद्याने सरकार रेशनिंगची व्यवस्थेतून माघार घेतली आहे.  यामुळे शासन जिवनावश्‍यक वस्तु पुरवणार नाही म्हणून खरेदी देखील करण्याचे बंद करेल व यातून वखार महामंडळ व अन्न सुरक्षा मंडळ Food Corporation of India देखील बंद होतील.   रेशनींग व्यवस्थेत शेतकरी वर्गाकडून शेतीमाल हा हमी भावाने खरेदी करून तो स्वस्‍त भावाने श्रमिक वर्गापर्यंत घेवून जाण्याची जबाबदारी शासनावर होती. अन्न सुरक्षीततेचा कायदा डाव्या विचारांच्या खासदारांनी लढून  पूर्वीच्या सरकारला करण्यास भाग पाडले होते . परंतू आता मोंदींच्या नव्या कायद्याने अन्न सुरक्षीततेच्या कायद्याला हरताळ फासली जाईल. 

रेशनींग व्यवस्थेवर देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 0.003 टक्के ऐवढा कमी खर्च येत होता.   परंतू आता तो देखील बंद केला जाईल.  शेतकरी वर्गाल मिळणारा हमी भाव व श्रमिकांना स्वत धान्य मिळवून देण्यात फक्त 0.003 टक्के ऐवढा कमी खर्च देखील सरकार करण्यास तयार नाही यावरून देशात पुढील काळात श्रमिकांना कशा प्रकारे नष्‍ट करण्याची पावले आखली जातील याची हि लक्षवेधी सुचना आहे.  जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 Essential Commodity Act 2020  या कायद्याने आता देशात अन्‍नाच्‍या लूटीचे सत्र सुरू झाले आहे हे लक्षात घ्यावे.

जागतिक स्पर्धेत शेतकरी वर्गाला ढकलून देवून, उद्योगपती, भांडवलदार, बहुराष्‍ट्‍रीय कंपन्यांच्या चाकरीला शेतकरी वर्गाला बांधणे व शेती उद्योगपतींच्‍या हावाली करणे हे या तिन कायद्याचा मुख्य हेतू आहे.

लेखक - प्रविण मस्तुद, 9960312963 (लेखक शेतकरी चळवळीशी संबधीत व पीएच.डी. संशोधक विद्यार्थी आहेत.)

हे वाचा - 

शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020

- https://bit.ly/39tQYWJ


शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020

- https://bit.ly/3frMoMy


तीन काळे कृषि कायदे काय आहेत ? जाणून घ्या सविस्तर ..

- https://bit.ly/39safI2


Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...