Skip to main content

शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020




 कायदा 2-

शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020- (The Farmer (Improment & Protection) Agreement & Price Assurance & Farm culture Act 2020 )

शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण या गोंडस नावाने शेतकरी वर्गाला गुलामीच्या खाईत ढकलण्यासाठी ह्या कायद्याची निर्मीती केली आहे. आधी हे लक्षात घ्यावे की, कायद्याचे नाव जितके लोभस व आकर्षक असते , त्या उलट शोषणकारी सरकार त्या कायद्यात तरतुदी करीत असते.  अशाच शेतकरी वर्गाला  नेस्तनाभूत करणार्‍या क्रुर तरतुदी या कायद्यात केल्या आहेत.

या कायद्यात हमी भाव नियंत्रित केला जाईल अशी तरतुद केली आहे. परंतु हा हमी भाव कोणा कडून नियंत्रीत केला जाईल यावर कायदा बोलत नाही.  याचा अर्थ स्पष्‍ट आहे की,  खाजगी कंपन्या जो शेतीमालाचा हमी भाव ठरवतील तो हमी भाव असेल.  म्हणजे ज्या कंपन्या शेतीमाल खरेदी करतील त्याच कंपन्या या हमी भाव ठवतील.  हे म्हणजे शेळीचे रक्षण करण्याची जबाबदारी लांडग्यावर देण्यासारखे आहे.  स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालच्या किंमती ठरवुन बाजारात ठरवुन दिलेल्या किंमतीपेक्षा कमी भाव असेल तर शासनाने खरेदी करावी असे ठरले असताना स्वामीनाथन आयोगाचे शिफारशीनुसार शेतमाल खरेदी करण्यास असमर्थ ठरले आहे.  म्हणजेच सरकार शेतमाल हा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ठरवुन दिलेल्या आधारभूत किमतीत खरेदी करणार नाही.  यामुळे आपसुकच स्वामीनाथन आयोग गुंडाळून ठेवला जाईल.


 ज्यांना हमीभाव  हवा आहे.  त्यांना  कंपनी सोबत करार करावा लागेल . कंपनी शेतकर्‍याला बियाणे , जंतुनाशके, लागवडीसाठी आवश्‍यक बाबी पुरवील . परंतू शेतीमालाचा दर्जा हलका असल्यास मनमानी पध्दतीने हा शेतीमाल खरेदी केला जाईल. बाजारात मालाची किंमत जास्त असली तरी देखील शेतकर्‍यास तो माल विकता येणार नाही. यामुळे हमीभावाची एैसी की तैसी होवून जाईल.यावरून मोंदींनी केलेला हमी भावाचा कायदा उद्योगपतींच्या फायद्याचा आहे हे स्पष्‍ट होते. 


 दुसर्‍या प्रकारात मोदींने केलेल्या कायद्याने कंत्राटदार शेतकर्‍यांची शेती एक ते पाच वर्षांसाठी करार पध्दतीने घेवू शकण्याचा आधिकार प्राप्त होईल.  यामुळे शेतीचे कंपनीकरण होवून शेतकरी आपल्या शेतीवरून बेदखल केला जाईल.  हा संमत केलेला कायदा म्हणजे शेतकरी उध्वस्त करण्याचा व शेती ताब्यात घेण्याचा हा मार्ग आहे.  कंत्राटी पध्दतीने शेती केल्याने कंत्राटदार, उद्योगपतींना बाजारात ज्याचा भाव जास्तीचा आहे अशाच मालाची निर्मीती करेल व एकाधिकाशाही निर्माण होण्याचा धोका होईल.


 स्वातंत्र्यापूर्वी भारताने कंत्राटी शेतीचा अनुभव घेतला आहे.  चहाचे व  कॉफी, निळचे मळे हे स्थानिक शेतकर्‍यांकडून ब्रिटीशांनी घेवून त्यावर मक्तेदारी करून त्याच शेतीवर शेतकर्‍यांचा शेतमजूर करून त्याला जमीनीपासून बेदखल केले गेले.  बिहारमध्ये निळचे आंदोलन आपल्याला माहितीच आहे. करार करून निळीचे उत्पादन करण्याचे बंधन इंग्रजांनी लादले होते .ज्यामुळे जिवनावश्‍यक शेतीमालाच्या उत्पन्नावर बंदी होती. ज्यातून  शेतकर्‍यांची उपासमार झाल्याचा इतिहास फार दुरचा नाही. या विरोधात शेतकर्‍यांनी आंदोलने केली . परंतू शेतकरी  कष्‍टकरी वर्गाला इंग्रजांच्या छळाला व अन्यायाला समोरे जावे लागले होते असा इतिहास आहे.  याच इतिहासाची पुनरावर्ती करण्याचा हेतू मोदी व आरएसएस चा आहे हे लक्षात घ्‍यावे.

लेखक - प्रविण मस्तुद, 9960312963 (लेखक शेतकरी चळवळीशी संबधीत व पीएच.डी. संशोधक विद्यार्थी आहेत.)

हे वाचा - 

जिवनावश्यक वस्तु दुरूस्ती कायदा - 2020

- https://bit.ly/3cvT0Ye 


शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020

- https://bit.ly/3frMoMy


तीन काळे कृषि कायदे काय आहेत ? जाणून घ्या सविस्तर ..

- https://bit.ly/39safI2

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...