Skip to main content

शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020


 

कायदा क्रमांक 1. शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 -(Farming Produce Trade & Commerce Promotion Facility centre Act. 2020.)


 हा कायदा नावा वरून जरी शेतीमाला उत्पादन व व्यापार सुविधा देण्या बाबत वाटत असला तरी मुख्यत: कृषी उत्‍पन्न बाजार समिती मोडून काढणे हे या कायद्यांचे उदिष्‍ट आहे.  या कायद्यामूळे शेतीमालन हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जिल्हा, राज्य व देशभर विकता येईल. कृषी उत्पन्न  बाजार समिती मध्ये शेतकर्‍याचा माल हा हमी भावाने घ्यावा घ्यावा लागातो.  आधारभूत किंमती पेक्षा या बाजार समित्या मध्ये कमी किंमतीने माल खरेदी करता येत नसल्याचे कायदेशीर बंधन असते हे या कायद्याने मोडून जाईल.  शेतकर्‍यांना रितसर पावती देवून मिळणारा सेस फंड यावर आधारीत हामाल, तोलार,  माथाडी, व्यापारी यांना त्याचा मोबदला मिळत असतो. यावर लोकशाही पध्दतीने निवडून आलेले प्रतिनीधी व शासकीय प्रतिनीधी लक्ष ठेवतात.  या कायद्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मोडून पडेल व बाजार समिती बाहेरचा बाजार वाढेल.  यातून शेतीमाल व्यापारी मनमर्जी किमतीत शेतीमाल खरेदी करतील व शेतकरी शोषणाची प्रक्रिया तीव्र होत जाईल.  कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये असणारे हजारो, लाखो मध्यम व्यापारी तसेच हमाल, तोलार, माथाडी यांच्या हाताचे काम जाईल.  बाजार समित्यांवर अवलंबून असणारे छोटे उद्योग  नष्‍ट होतील. बाजार समित्यांकडे असणारी हजारो एकरांची जमीन जी सध्या सर्वाजनिक आहे . ती खाजगी मालकीची होण्यास वेळ लागणार नाही.  बाजार समित्या बाहेर हुकूमशाही पध्दतीने शेती माल खरेदी केला जाईल.  यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण होण्या आगोदरचा जो सरंजामी काळ होता तो काळ परत येण्यास मदत झाल्या शिवाय राहणार नाही.  सरकारी आकडेवारीनुसार 86 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत.  


या शेतकर्‍यांचा माल बड्या व्यापार्‍यांकडे जाण्यास वेळ लागणार नाही. कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल ठेवण्याची सोय केलेली असते.  हा शेतीमाल उघड्यावर राहणार नाही . याची दक्षता घेण्यासाठी व्यापारी, तोलार, मध्यस्थी दलाल, हमाल इत्यादी घटकांची नियमाने बांधीलकी असते हि बांधीलकी खाजगी बाजार पेठेत दिसत नाही.  याचा फटका देखील शेतीमालाला व त्याअनुषंगाने शेतकर्‍याला बसणार आहे.  या सर्व व्यापारातून  मिळणारा सेस फंड, बाजार समित्या व शासनास मिळत असतो.  या आधारे शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जातात . ज्या खाजगी बारपेठेत दिसत नाहीत. शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावाच्या खाली कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये व्यापार्‍यांना शेतीमाल खरेदी करात येत नाही ती मुभा कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडल्याने व्यापार्‍यांना मिळेल, यात खाजगी बाजार समित्या शेतकर्‍यांची लयलूट करण्यात पुढाकार घेतील.  कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पडल्याने व्यापारी, हामाल, तोलार, चाळणीवाले, वारणीवाले यांचा रोजगार तर नष्‍ट होईलच सोबत चहाच्या टपर्‍या सुतळीवाले, बारदाना व्यापारी, वजनकाटेवाले यांचे ही आर्थिक नुकसान होवून आर्थीक घडी विस्कटून जाणार  आहे.  बहुतांशी पशु व्यापार जो आजही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात होतो व त्याचा आर्थिक फायदा शेतकरी वर्गापर्यंत पोहचतो तो देखील या कायद्याने बंद होणार आहे. 


 कृषी उत्पन्न बाजार समित्या केंद्र सरकारणे केलेल्या कायद्याने मोडल्यास मक्तेदार भांडवलदार, बडे कंपनीधारक, मक्तेदार कंपन्या तसेच कोणतीही पॅनकार्ड धारक व्यक्ती किंवा समुह शेतमालाची खरेदी करेल.  हा माल खरेदी केल्यांनतर पैसे न दिल्यास कायद्याने कोठेही दाद मागता येणार नाही.  कंपन्या व व्यापार्‍याना  कृत्रिम टंचाई निर्माण करून जास्त भावाने शेतमाल विकून कष्‍टकरी वर्गाचे शोषण करता येईल.  यामुळे महागाईचा आगडोंब उसळेल व यास शासन कायद्याने महागाई रोखण्यासाठी कोणतेही बंधन करू शकणार नाही.

या विधेयकामुळे शेतमालाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर जाऊन आंतरराज्य आणि आंतरजिल्हा विक्री करण्याची मुभा मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक व्यापाराचीही तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

आता सुर्यप्रकाशा ऐवढे हे स्पष्‍ट दिसत आहे की,  अदाणी, अंबानी हे मोदींनी व त्यांच्या  भाजपा, आरएसएसनी त्यांचा फायदा करून देण्यासाठी व श्रमिक जनतेचे शोषणाची पक्रिया तीव्र करण्यासाठी निवडलेले उद्योगपती भांडवलदार आहेत.  या अदाणी व अंबानींनी ठिकठिकाणी गोडाउन बांधून ठेवले आहेत.  केंद्र सरकारने  संमत कलेले तीन  काळे कृषी कायदे संमत होण्या आगोदर पासून हे गोडाउन बांधले जात होते. यावरून मोदी कोणता कायदा करणार याची स्पष्‍ट माहिती या उद्योगपतींना होती हे दिसते आहे.  हे उद्योगपती समुद्रापलीकडे माल घेवून जाउन देशातील जनतेला अन्ना वाचून  मारतील , हे नवे संकट आपल्या पुढे या कायद्याने उभे राहिल.  या कायद्याने बहुराष्‍ट्‍रीय कंपन्यांया अदाणी - अंबांनी सारख्या उद्योगपतींना हाताशी धरून श्रमिकांच्या मालावर डल्ला मारणार आहेत, हे सर्व मोदींनी केलेल्या  कायद्याने होईल.

लेखक - प्रविण मस्तुद, 9960312963 (लेखक शेतकरी चळवळीशी संबधीत व पीएच.डी. संशोधक विद्यार्थी आहेत.)

हे वाचा - 

जिवनावश्यक वस्तु दुरूस्ती कायदा - 2020

- https://bit.ly/3cvT0Ye 


शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020

- https://bit.ly/39tQYWJ


तीन काळे कृषि कायदे काय आहेत ? जाणून घ्या सविस्तर ..

https://bit.ly/39safI2

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...