Skip to main content

आमच्यासाठी गाडी धावेल का ?

                                                   
 रस्ते आम्हीच बनवले


पण त्या रस्त्यावरून आमच्यासाठी गाडी नाही धावली. म्हणून तो कामावर बहिष्कार नाही टाकला
हे चित्र बार्शी  येथील पोस्ट ऑफिस समोरील सोलापूर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे आहे. लॉकडाउन मध्ये थोडी शिथिलता आली. आणि कामगार जो उपाशी होता तो तसाच पोटासाठी कामावर रुजू झाला. तोंडाला फडकं बांधलेलं.  दुपारच्या साडेबारा एक दरम्यान रखरखत्या उन्हात जीव गुदमरत होता ,त्यात पुन्हा शारीरिक अंतर आणि हे कामगार काम करत होते. उद्या पूर्ण लॉक डाऊन उठवल्यावर या रस्त्यावरून जाताना तुम्हा आम्हाला गाडी चालवताना तत्रास होऊ नये याची तो खबरदारी घेत तर नसेल?.  खर तर सगळीकडे भीतीच साम्राज्य पसरले असताना हे निडर जीवाची परवा न करता रस्त्याचं काम करायला उतरले. कारण त्यांच्या पोटात भुकेची आग होती. लेकरं उपाशी होती.

लाखो कामगार आप आपल्या गावी मिळेल त्या वाहनाने , मिळेल त्या रस्त्याने, कोणी गाडीवर, कोणी कंटेंनरमध्ये बसून, कोणी सायकलवरच हजारो किमो  गेला. त्यापेक्षा भयानक जे होत ते लेकरं बाळ महिला यांचा जीवघेणा चालत जाणारा प्रवास जो अजूनही चालू आहे. पाय फाटले, रस्त्यांनी चराचरा पोळले,  रक्तबंबाळ झाले.कधी कोलमडून पडले. तरी चालणं थांबवलं नाही. रस्त्यानं चालू देईना म्हणून रेल्वेच्या रुळावरून चालू लागले. चालता चालता थकली गेली आणि तिथेच झोपी गेली ती कायमची. सगळा देश हाळहळून गेला.

 आत्मनिर्भरतेच धडेे दिले गेले पण कामगारासाठी ठोस काही केलं नाही. उलट कामगार कायदेच बंद दाराआडून लॉक डाऊन ची संधी साधत गुंडाळायला लागलयं हे सरकार.
परदेशातील लोकांना सुखरूप आणलं परत पण माझ्याच देशातील ज्यांनी ही शहर उभा केली. रस्ते बांधले, विमानतळ उभारली, शहर सजवली त्या शहरातुन बाहेर पडताना हा कामगार बकाल झालेला.

तरी तो त्या शहरावर नाराज नाही झाला त्याच एवढंच म्हणन  आहे, आम्हाला आमच्या घरी जाऊद्या. नाही ऐकलं कोणी त्याच नियमांचं मोठी लठ्ठ लिस्ट त्यासमोर मांडली आहे. हजारो कामगार आजही घरी जाण्यासाठी दररोज या नियमांची पूर्तता करत आहे. ज्याचा नंबर लागला त्याला आनंद गगनात मावेना झाला. ज्याचा नाही लागला तो पुन्हा नव्याने कामाला लागतो हे दररोज चालूच आहे.

हा शहर सजवलेला कामगार परत जातो आहे तो पुन्हा येईल का या शहरात?? जिथे त्याच्या आठवणी जुडल्या आहेत. तो पुन्हा येईल का ही शहर सजवायला .?? तो पुन्हा येईल का हजारो किमो वरून त्याच लेकरं बाळ कुटुंब सोडून.?
या रस्त्याच काम करणाऱ्या कामगारां बघून हे सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.

                                दत्ता चव्हाण
      (लेखक डाव्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...